जामनेरला महाराष्ट्र दिनी घडली घटना, भूमी अभिलेख विभागावर संताप
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेरात शेतकर्याने ध्वजारोहणादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. जमिनीची मोजणी होत नसल्याने खर्चाणे ता.जामनेर येथील शेतकरी बाबुराव बंडू पाटील यांनी भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर आत्मदहनचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी आठ वाजता घडला.
गेल्या दोन महिन्यापासून भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी यांना वेळोवेळी अर्ज देवून तसेच जामनेर येथील कार्यालयात जावून देखील सबंधित अधिकारी विषय समजून घेत नाहीत. शेतजमिनीची मोजणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची माहिती बाबुराव पाटील यांनी दिली. उपस्थित पोलिसाने त्यांना रोखल्याने अप्रिय घटना घडली. मात्र आता भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करतात किंवा त्यांच्याविरुद्ध काय भूमिका घेतात याकडे जामनेर तालुक्यातील लक्ष लागून आहे.