धरणगाव (प्रतिनिधी ) – धरणगावात काल रात्री आपले बॅनर फाडलेत परंतु मी सांगतो अशा या चिंधीचोरांकडे लक्ष देऊ नका त्यांचा मुखवटा पाडण्यासाठीच मी येथे आलो आहे. अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धरणगावातील शिवसंवाद यात्रेत केली . यावेळी आदित्य ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती .
धरणगावात आपल्या ३० मिनिटाच्या संवादामध्ये आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यासह बंडखोरांवर सडकून टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, थोडी लाज शिल्लक राहिली असेल तर पहिले आपण आमदारकीचा राजीनामा द्या व नवीन निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले. दरम्यान बॅनर फाडल्याप्रकरणी धरणगावात गुन्हा दाखल झाला अाहे