रावेर ;- रावेरला उसळलेल्या रविवारी दि.२२ रोजीच्या दंगलीने संचारबंदी लावण्यात आली होती, मंगळवारी दुपारी दोन तास शिथिलता देऊन, रात्री पुन्हा संचारबंदीत १२ तास वाढ झाली होती.
बुधवारी दुपारी दोन तास सूट दिल्याने नागरिकांनी भाजीपाला व किराणा व दूध घेण्यासाठी कालप्रमाणे गर्दी केल्याचे चित्र दिसले.
मिरच्या, भेंडी, कोबी, भोपळे, गंगाफळ हा भाजीपाला विक्रीसाठी आला होता. यात नियमित भावापेक्षा चढ्या भावाने आज विक्री सुरू होती. दोन तासासाठी अनेक नागरिक मोटासायकली घेऊन रस्स्यावर आल्याने प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले व परिक्षाविधीन उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे,तहसीलदार उषाराणी देवगुणे,वन परिक्षेत्राचे मुकेश महाजन यांनी नागरिकांना स्टेटबँकजवळ अडवून पायीच खरेदीसाठी जाण्याचा सल्ला दिल्याने,वाहन धारकांची चांगलीच दमछाक झाली. काही वाहन चालक ऐकत नसल्याने प्रांतअधिकारी व तहसीलदार यांनी लाठीचार्ज करून वाहन चालकांना चांगलाच चोप दिला.