जामनेर (प्रतिनिधी ) – मृत व्यक्तीची जमीन परस्पर दुसर्याच्या नावावर केल्याचे उघड झाले असून तलाठी, सर्कल यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
शेंदुर्णी येथील रहिवाशी जिजाबाई देविदास माळी (वय ५५) यांनी पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे पती देविदास गोविंदा माळी यांचे २८ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. पतीच्या मृत्युनंतर त्यांनी ई-सेवा केंद्रावर जाऊन मृत देविदास माळी यांच्या नावे असलेला उतारा काढला. त्यात मृत पतीसह जनाबाई माळी यांच्या नावाचा सामाईक उतारा मिळाला. हे पाहून जिजाबाई यांनी तलाठ्यांना विचारणा केली असता या जमिनीचे न्यायालयात वाद असल्याचे सांगितले होते. जिजाबाई माळी यांच्या फिर्यादीवरुन अफरातफर करुन फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी शांतीलाल नाईक व मंडळ अधिकारी हर्षल पाटील यांच्यासह जनाबाई माळी व अन्य एकावर पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला