नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – गेल्या आठवड्यात जगभरात 31 लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले भारतामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी रेटही घसरत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. 14 दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्यांनी काळजी घ्यावी, ‘ असे लव अग्रवाल म्हणाले.
आठ राज्यात सध्या कोरोनाचे 50 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण आहेत. 12 राज्यात दहा हजार ते 50 हजार रुग्ण आहेत. 16 राज्यात 10 हजारांपेक्षा कमी अॅक्टिव रुग्ण आहेत. सर्वाधिक अॅक्टिव कोरोना रुग्ण केरळ, तामिळनाडू , कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहेत. दहा टक्केंपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणारे देशात 297 जिल्हे आहेत. देशात सध्या 96% टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. 76% लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 15 ते 18 वयोगटातील 65% मुलांनी पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत 1.35 कोटी प्रिकॉशनरी डोस देण्यात आले आहेत.
सक्रीय रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. आतापर्यंत एकूण लसीकरण- 167.88 कोटी झाले आहे. 18 वर्षावरील लोकसंख्येत 96% नागरिकांनी घेतली पहिली मात्रा घेतली आहे. 76% नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचे सरासरी वय 44 वर्षे आहे, जे यापूर्वी 55 होते. घसादुखीचे प्रमाण 29% एवढे आहे, जे पूर्वी 16% होते. तिसऱ्या लाटेत तुलनेने गोळ्या सेवनाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर मृत्यूचे प्रमाण 10% (91% सहव्याधी) लस न घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 22% (83% सहव्याधी) आहे.