मुंबई: राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या आज २३० वर पोहचली असून यातील १२२ रुग्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील असल्याने या दोन्ही महानगरांमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई, ठाण्यानंतर पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत करोनाचे ४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सांगलीत करोनाचे २५, नागपूरमध्ये १७, अहमदनगरमध्ये ५, रत्नागिरीत १, औरंगाबादमध्ये १, यवतमाळमध्ये ३, साताऱ्यात १, सिंधुदुर्गात १, कोल्हापुरात २, जळगावात १, बुलडाण्यात ३ करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत.