साक्रीत लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला
साक्री ( प्रतिनिधी ) – लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाला साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. अक्कलपाडा जवळील पौरबाबा मंदिराजवळ झालेल्या या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरडाणे येथून तामसवाडीच्या दिशेने वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारे वाहन (क्र. एमएच १८ डब्ल्यू ६२२६) दुपारी २ वाजेच्या सुमारास निघाले होते. लग्न मंडपात पोहोचण्यापूर्वीच समोरून येणाऱ्या एका हेलकावे खाणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले. या भीषण अपघातात काव्या स्वप्निल पाटील (वय ३ वर्ष, रा. शिरडाणे) आणि भटुबाई साहेबराव पाटील (वय ४८, रा. बिडगाव, ता. चोपडा) हे दोघे जागीच ठार झाले आहेत.


अपघातातील जखमींची नावे
१. गितेश्वरी अविनाश पाटील (वय ६)
२. सुशिलाबाई शांताराम पाटील (वय ६५)
३. कल्याणी रवींद्र पाटील (वय ३५)
४. पंकज पाटील (वय ४५)
५. चैताली पृथ्वीराज पाटील (वय १८)
६. प्रांजल नितीन पाटील (वय २२)
७. जागृती छोटू पाटील (वय ४०)
८. दीपाली रोहिदास पाटील (वय २१)
९. भूमिका गुलाब पाटील (वय १८)
१०. वैष्णवी महेंद्र पाटील (वय १९)
११. भिकुबाई शिवदास पाटील (वय ५५)
१२. मनिषा संतोष बाविस्कर (वय ३५)
१३. नयना सुखदेव पाटील (वय १०)
१४. इंदुबाई पांडुरंग पाटील (वय ७०)
१५. चमाबाई थिला पाटील (वय ६५)
घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









