सोयगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे घरांची पडझड सुरूच आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव शहरात भवानीपुरा येथे घराची भिंत कोसळल्याने आजी व नातू हे जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. ३ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता घडली आहे.
कोकिळाबाई संजय बागुल (वय ४३) आणि मोहित गणेश सपकाळे (वय ४, दोन्ही रा. भवानीपुरा, सोयगाव) असे जखमींचे नाव आहे. मंगळवारी पहाटे मोहीतला अंघोळ घालण्यासाठी कोकिळाबाई बागुल या न्हाणीघरात होत्या. (केसीएन)त्यावेळेला अचानक घराची भिंत दोघांच्या अंगावर कोसळली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ दोघांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यावर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोघानवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोकिळाबाई बागुल यांच्या परिवाराची स्थिती हलाखीची स्थिती असल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.