धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुसळी येथील बेपत्ता ७८ वर्षीय वृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी १२ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
द्वारकाबाई आसाराम पाटील (वय ७८, रा. मुसळी ता. धरणगाव) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात ३ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेती काम करून पाटील परिवार उदरनिर्वाह करतात.(केसीएन)द्वारकाबाई पाटील ह्या मंगळवारी राहत्या घरून कोठेतरी बाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे परिवाराने पोलीस स्टेशनला द्वारकाबाई ह्या बेपत्ता झाल्याबाबत माहिती दिली होती.
दरम्यान, त्यांचा शोध सुरु असताना मुसळी गावातच एका शेताच्या विहिरीत सकाळी ११ वाजता काही ग्रामस्थांना द्वारकाबाई ह्या विहिरीत पडलेल्या दिसून आल्या.(केसीएन)त्यांना बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. प्रसंगी परिवाराने शोक व्यक्त केला. घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.