महाराष्ट्र शासनाने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. विशेषतः अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासोबतच सिंचन, जलसंपदा, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील विकासकामांना गती मिळून ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगाने होईल.
हा अर्थसंकल्प “समृद्ध आणि सक्षम महाराष्ट्र” घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.











