अजिंठा घाटातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : सासरवाडीहून जळगाव येथे परतत असतांना दुचाकी घसरल्याने गंभीर दुखापत होवून तालुक्यातील मोहाडी येथील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अजिंठा घाटजवळ घडली आहे. या घटनेमुळे मोहाडी गावात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र गोपाळ तायडे (वय-५५, रा. मोहाडी ता.जि.जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. राजेंद्र तायडे हे पत्नी, दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होते. ते जळगाव महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सासरवाडी असल्यामुळे ते दुचाकीने कामानिमित्त भेटीसाठी गेले होते. काम आटपून सोमवारी १८ डिसेंबर रोजी दुचाकीने जळगावकडे परतत असताना सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अजिंठा घाटनजीक त्यांची दुचाकी स्लिप झाली.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर मोहाडी गावातील नातेवाईकांनी धाव घेतली. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, पवन आणि सनी ही दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे









