मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात
अमळनेर : येथील डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांच्या सतर्कतेने व तंत्रशोधक पद्धतीचा अवलंब केल्याने हरवलेले ३७ मोबाईल आढळून आले असून हे मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी तंत्रज्ञ पोलीस उज्ज्वल पाटील यांच्यावर मोबाईल शोधण्याची जबाबदारी टाकली होती. उज्ज्वल पाटील यांनी तांत्रिक यंत्रणा वापरली असता हरवलेले ३७ मोबाईल राजस्थान, गुजरात, नाशिक, पंढरपूर, अमरावती, मालेगाव,भुसावळ, जळगाव, घुळे आदी ठिकाणी असल्याचे शोधून कादले, त्यानंतर तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्या-त्या व्यक्तींकडून मोवाईल जप्त करण्यात आले.
उज्ज्वल पाटील, हितेश बेहरे यांनी विविध ठिकाणाहून है मोवाईल परत आणले व्राणि मूळ मालकांशी संपर्क करून त्यांना हे मोचाईल परत देण्यात येत आहेत. नागरिकांनी आपले मोबाईल व मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावेत तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल विकत घेऊ नये, असे आवाहन डीवायएसपी सुनील नंदवाजकर बांनी केले आहे.