अमळनेर (प्रतिनिधी) : शेतातील भिंत तोडून व १५० फूट पाईपलाईन तोडून नुकसान करणाऱ्या दहिवद येथील दाम्पत्यावर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता जगन्नाथ पाटील यांनी फिर्याद दिली. त्या, गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी मुलांकडे गेल्या असताना संभाजी नथु पाटील व आशाबाई संभाजी पाटील यांनी मे महिन्यात तिच्या शेतातील भिंत आणि १५० फूट पाईप लाईन खोदून ठेवली होती. त्यातील १५ पाईप चोरीला गेले होते. तसेच याबाबत २७ ऑगस्ट रोजी त्यांना बोलायला गेली असता त्यांनी शिवीगाळ केली व ७ पाईपांची तोडफोड केली.
यावरून दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील तपास करीत आहेत.