विष्णापुर गावात शोककळा ; यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील डांभुर्णी येथून केळीचे घड घेऊन शेतामध्ये मजुरीसाठी जात असलेल्या मोलमजुरी करणाऱ्या मातेचा दुचाकी घसरल्यामुळे कोळन्हावी गावाजवळ सोमवारी दि. १५ जुलै रोजी अपघात झाल्याने तिच्या डोक्याला मार लागून तिचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या चिमुकल्या मुलांच्या डोळ्या देखत हा अपघात झाल्याने या दोन्ही चिमुकल्यांचे मातृछत्र हरपल्याने कृष्णापूर गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तुळसाबाई रमेश भील (वय २५, रा. विष्णापुर ता. चोपडा) विवाहितेचे नाव आहे. ती पती, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह वास्तव्यास होती . . मजुरी काम करून तिचा पती उदरनिर्वाह करीत होते. . दरम्यान सोमवारी दि. २५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे डांभुर्णी येथून शेतामध्ये तुळसाबाई, त्यांचे पती रमेश आणि चार वर्षांची मुलगी गायत्री शेतात मजुरीसाठी जात होते. (केसीएन) कोळन्हावी गावाजवळ आले असताना त्यांची दुचाकी घसरून अपघातात तुळसाबाई रस्त्यावर पडून डोक्याला जबर इजा पोहचल्याने तुळसाबाई यांना तातडीने तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल(केसीएन) करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासून तुळसाबाई हिला मयत घोषित केले. डोळ्यासमोरच अपघातात पत्नी गेल्यामुळे पतीने आक्रोश केला. तर चिमुकली हि निरागस नजरेने मातेच्या देहाकडे पाहात असल्याने तिला काय झाले हे समजण्याइतपत जाणीव नसल्याने तिच्याकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावून गेले.
या घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान, दोन्ही मुलं आईच्या मायेला पोरकी झाल्यामुळे यावल आणि चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.