जळगाव – ज्याप्रमाणे रामराज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता. असेच हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. याच संकल्पनेवर आधारित हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राला कोणी विरोध करण्याचे कारण नाही. जर्मनी, इटली, इंग्लंड, फ्रान्स या ख्रिस्ती राष्ट्रांत, तसेच सौदी अरेबिया, ओमान,तुर्कस्थान आदी मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर हिंदू जाऊन काम करू शकतात, राहू शकतात, मग भारत हिंदु राष्ट्र झाल्यानंतर अन्य धर्मीय येथे का राहू शकणार नाहीत ? ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही हिंदु राष्ट्राची संकल्पना आहे; मात्र सेक्युलरवाद्यांनी हिंदु राष्ट्राविषयी अनाठायी भीती निर्माण केली आहे.न्याय, समता आणि बंधुता यांची शिकवण देणारे हिंदु राष्ट्रच सर्वकल्याणकारी असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. १ मार्च या दिवशी येथील शिवतीर्थ मैदानावरील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.
*** सभेच्या प्रारंभी देहली येथील दंगलीत प्राणांचे बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि हिंदू बांधवांसाठी “श्री गुरुदेव दत्त” यांना प्रार्थना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ***
श्री. रमेश शिंदे म्हणाले की, ‘भारताला इस्लामिक राष्ट्र करण्यासाठी चालू असलेल्या ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ यांची सर्वांना माहिती आहे. आता मात्र भारताला आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्यासाठी‘हलाल जिहाद’ हे नवीन षड्यंत्र चालू आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. यातून १४ टक्के अल्पसंख्यांकांची उर्वरित ८५ हिंदू समाजाला सेल्युलरवादाच्या नावाखाली एकप्रकारे हुकुमशाही चालू आहे.’
शंखनादाने या सभेला प्रारंभ झाला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन झाले. व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर वेदमंत्रपठण झाले. धर्मप्रेमींच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. धर्मप्रेमी श्री. राहुल चौधरी यांनी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा,सत्यब्रह्म संस्थेचे संचालक श्री. किरण महाजन यांनी ईश्वरप्रसाद खंडेलवार यांचा, जळगाव बार असोसिएशनचे अॅड. प्रभाकर पाटील यांनी अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा, तर चिंचोली येथील धर्मप्रेमी श्री. किरण घोगे यांनी श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार केला. यानंतर सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता यापासून स्वत:चे रक्षण कसे करावे, यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षणाची प्रात्येक्षिके सादर करून दाखवली. या सभेचे सूत्रसंचालन कु.रागेश्री देशपांडे यांनी केले.
राष्ट्रीय नागरिकता विधेयकाच्या विरोधी आंदोलनातून भारताला कमकुवत करण्याचे षड्यंत्र ! – श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
सद्यस्थितीत देशाच चालू असलेले गृहयुद्ध हे साधारण नाही, तर विदेशी शक्तीच्या पैशाच्या जोरांवर राष्ट्रविरोधी शक्तींचे भारताला कमकुवत करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे. ‘जी स्थिती देहलीत आहे, ती येथे निर्माण होणार नाही’, असे आपण समजू नये. आपणाला सर्वांना सावधान राहिले पाहिजे. ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या राष्ट्रविरोधी संघटनेच्या विविध खात्यांमध्ये १२८ कोटी रुपये इतका निधी जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एवढा पैसा कुठून आला ?यांचा उद्देश देहलीतच नाही, तर भारताच्या अन्य राज्यांत अशांती निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे.त्यामुळे बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजावर स्वत:च्या रक्षणासह राष्ट्राच्या रक्षणाचे दायित्व आहे. या सर्व समस्यांचे ‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हा एकच उपाय आहे. ा हिंदु राष्ट्र स्थापन करे. हिंदु राष्ट्राच्या आंदोलनाला गती प्राप्त करून द्यायला हवी. तरच भारतात सर्वजण शांतीने राहू शकतील. तरच भारत विश्वगुरु होऊ शकेल. भारताच्या वैदिक सनातन संस्कृतीमध्येच ती ताकद आहे.
गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या !
– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
केवळ हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हे संकुचित ध्येय न ठेवता ‘कृण्वतो विश्वम आर्यम्’ म्हणजे अखिल विश्व सुसंस्कृत करू, अशी आपल्या पूर्वजांची घोषणा होती. ही घोषणा सार्थ करण्याचे धर्मकर्तव्य आपण सर्वजण पार पाडूया. यासाठी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे.धनुर्धारी अर्जुनाचा प्रत्येक बाण लक्ष्यवेध करायचा; कारण तो सतत श्रीकृष्णाचा जप करायचा. नामजपामुळेच धर्मरक्षराच्या कार्यासाठी आत्मबळ मिळणार आहे. गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या.
अन्याय झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू ! – अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद
आज देशात अल्पसंख्य संघटित असून,त्यांच्याकडून हिंदूंवर अन्याय होत आहेच.त्याचबरोबर त्यांच्या संघटनाच्या प्रभावामुळे राजकीय शक्तीही अन्यायग्रस्त हिंदूंची बाजू ऐकून घेत नाहीत. देशाच्या राज्यघटनेत बहुमताला स्थान असले, तरी बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान मिळत आहे. देशातील कायदे अल्पसंख्याकांसाठी,मानवाधिकार अल्पसंख्याकांसाठी, सोयी-सवलती अल्पसंख्याकांसाठी, असे आताचे स्वरूप झाले आहे. त्यात अल्पसंख्याकांनी सांप्रदायिक दंगल करू द्या वा गोहत्या करू द्या, त्यात अन्यायग्रस्त हिंदूंवरच कारवाई करून आजची ‘धर्मनिरपेक्षता’पाळली जाते. अशा वेळी कायद्याचा गैरवापर केला जातो. यामुळेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना न्याय मिळवून देण्याकरिता कायद्याची योग्य ती माहिती आणि वापर आवश्यक आहे.हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मागे अधिवक्त्यांचे बळ असेल, तर कार्य करणे सोपे होते. हेच आज आम्हा हिंदु अधिवक्त्यांचे हिंदुत्वाच्या कार्यासाठीचे आवश्यक कर्तव्य आहे.
आज भ्रमणभाष अथवा दूरभाष उचल्यावर आपण ‘हॅलो’ म्हणतो. हिंदूंनी ‘हॅलो’ म्हणण्यापेक्षा‘जय श्रीराम’, ‘जय श्रीकृष्ण’, ‘नमस्कार’ आदी म्हणून बोलायला आरंभ केला, तर आपोआपाच भगवंताचे स्मरण होईल. याच समवेत हिंदूंनी आजपासून टिळा लावायला आरंभ करा केला पाहिजे. त्याहीपुढे जाऊन हिंदूंनी असाही संकल्प केला पाहिजे की मी स्वतः प्रतीदिन टिळा लावीन,परिवारातील सगळ्यांचे त्याविषयी प्रबोधन करीन.
क्षणचित्रे
१. या वेळी हिंदु राष्ट्र-स्थापनेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
२. सभास्थळी क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण महत्त्व विषद करण्यासाठी बालचमूंनी क्रांतीकारक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता.याद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत होते.
३. सभास्थळी सनातन संस्थेने केलेले प्रकाशित विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने,तसेच क्रांतीकारक, राष्ट्रपुरुष यांचे महत्त्व सांगणारे आणि धर्माचरण कसे करावे, यांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.