जिल्ह्याधिकाऱयांची घोषणा ; पूर्वीच्या नियमानुसार होतील दैनंदिन व्यवहार

जळगाव ;- जळगाव, भुसावळ व अमळनेरात सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन आज संपल्यानंतर याला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची महत्वाची घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे. यामुळे उद्यापासून या तिन्ही शहरांमध्ये शासकीय नियमांसह अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे ६ जुलैपर्यंत ज्या प्रकारे नियम होते. त्याच प्रकारचे नियम हे १४ जुलैपासून सुरू राहतील.
जळगाव तसेच भुसावळ व अमळनेर शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या तिन्ही शहरांमध्ये सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. यात अगदी किराणा सारख्या अत्यावश्यक सेवेची दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती. तिन्ही शहरांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे खरोखर लॉकडाऊनच्या नियमांचे बर्यापैकी पालन करण्यात आले. दरम्यान, आज सोमवारी लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असल्याने आता याला मुदतवाढ मिळेल की, अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमिवर, जळगाव, भुसावळ व अमळनेरात मंगळवार दिनांक १४ जुलै पासून शासकीय नियमांच्या अधीन राहून अनलॉक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
केंद्र व राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या नियमांच्या आधारे जळगाव, भुसावळ व अमळनेरात व्यवहार पूर्वपदावर येण्यास मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. जळगाव शहरातील व्यापारी संकुलांमध्ये दुकाने खुलण्याचा मार्ग काही दिवसांपूर्वीच मोकळा झालेला आहे.
सक्तीच्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनाचे चक्र अक्षरश: थांबले असून यामुळे अर्थव्यवस्थाही ठप्प झालेली आहे. या पार्श्वभूमिवर, मंगळवारपासून







