पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
मुंबई/ जळगांव ;- भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती राज्यसरकारने उठवली आहे यामुळे या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला असून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला यशस्वी पाठपुरावा सार्थक ठरला असून वरणगाव करांची तहान आता भागणार आहे.
आधीच्या युती सरकारच्या काळात ही २५ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली परंतु सरकार बदलानंतर सर्वच योजनाना स्थगिती देण्यात आली होती. या पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने या योजनेला मान्यता मिळावी यासाठी नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पाठपुरावा केला होता याचे फलित म्हणून आज या योजनेवरील स्थगिती उठवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते प्रकल्पपैकी ज्या प्रकल्पांचे कार्यादेश ५ डिसेंबर २०२० पूर्वी देण्यात आले नव्हते. हे अशा प्रकल्पांचे कार्यादेश पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये अशा सूचना शासनाने 5 डिसेंबरला दिल्या होत्या. *आज सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याचे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास ती पूर्ण करून कार्यादेश देण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आज नगर विकास विभागाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
या पाणीपुरवठा योजनेत ला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने ही योजना मंजूर करण्यात आली असून यामुळे वरणगावकर यांची तहान भागणार आहे.