संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
शिरसोली (वार्ताहर) :- २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे लेखिका-रुद्राक्षी पाटील लिखित”सायली”या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सायली या एका अनाथ मुलीला एका शिक्षिकेने संपूर्ण शिक्षण देऊन तिला भावनिक आधार देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. आणि त्या अनाथ मुलीच्या उन्नती मध्ये शिक्षिकेची भूमिका व तिची मैत्रीण अवनी यांची कथा या बालनाट्य मध्ये दर्शविण्यात आलेली आहे.
अतिशय भावुक व मनाला भिडणारी कथा व प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणार हे नाट्य या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असं सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकलीत. सदर नाटकाचे दिग्दर्शन-विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख चंद्रकांत कुमावत यांनी केले. नेपथ्य-कलाशिक्षक सुनील ताडे यांनी केले. सायलीचे पात्र-विद्यार्थिनी रूपाली गवळी तर अवनीचे पात्र पायल बारी हिने केले. सदर बालनाट्यसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अशोक बारी, उपाध्यक्ष दिलीप बारी, सचिव-सुरेश अस्वार, शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकर तांदळे, संचालक व शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे, पर्यवेक्षिका सुरेखा दुबे, ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, सुनील भदाणे, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी, ज्येष्ठ लिपिक संभाजी अस्वार व सर्व विद्यालयाचे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांनी संघाचं अभिनंदन केलं.