जळगाव तालुक्यातील तरसोद फाट्यावरील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील तरसोद फाट्यानजीक उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळाली. कारमधील दोघेजण सोडा पिण्यासाठी खाली उतरले आणि त्याच वेळी कारने पेट घेतला. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
विकास शांताराम नेरकर व ज्ञानदेव नारायण कठोरकर (दोघे रा. चारठाणा) हे कारने (एमएच ०६, बीएम ७०९९) जात असताना तरसोद फाट्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाच्या खाली ते थांबले. सोडा पिण्यासाठी ते खाली उतरले आणि काही वेळातच कारने पेट घेतला. काहींनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मनपाच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचला व आग विझविण्यात आली. कर्मचारी देविदास सुरवाडे, भगवान पाटील, इकबाल तडवी, महेश पाटील, मनोज पाटील यांनी आग विझविली. दरम्यान, या आगीमध्ये कारचालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.