चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच व मराठा चळवळीतील कार्यकर्ता संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी अभय देणाऱ्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दि १३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार, चाळीसगावद्वारा मागणी करण्यात आली आहे.
मराठा चळवळीतील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देवून महाराष्ट्र सरकारने संपूर्ण मराठा समाजाला न्याय द्यावा.अन्यथा लोकशाही व प्रशासनावरचा विश्वास जनतेचा उडाल्याशिवाय राहणार नाही.तसेच संतोष देशमुख यांच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संतोष देशमुख यांच्या कुंटुबाला आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. अन्यथा राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारला त्याची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. समाजाला घातक असलेल्या अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार प्रशात पाटील द्वारा मागणी करण्यात आली आहे.
तसेच चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने हत्याचा निषेध करण्यात आला आहे, निवेदनावर गणेश पवार, दिलीप पाटील, अरुण पाटील, खुशाल बिडे,पी एन पाटील, विलास पाटील, दिलीप बिराजदार, योगेश पाटील मुकुंद पवार, भरत नवले, दीपक देशमुख, कैलास पाटील, योगेश पाटील, रवींद्र गायकवाड, कुणाल पाटील, सुनील चव्हाण, आर.बी. जगताप, डॉ. अजय पाटील, अशोक भोसले, दिलीप पवार, अमोल पवार, विजय पवार, आनंदा पवार, नाना नवले, नाना कापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.