जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आव्हाणे गावात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वैभव अनिल पाटील (वय २२, रा. आव्हाणे ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. वैभव पाटील हा परिवारासह वास्तव्याला होता. दि. १९ नोव्हेंबर रोजी वैभव पाटील हा घरी एकटाच असताना त्याच्या अंगावर गरम पाणी पडले होते. त्यानंतर तो घराबाहेर ओरडत आला होता. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.