४ जणांवर काठमांडूला उपचार सुरु
जळगाव (विशेष वृत्त) : नेपाळ बस दुर्घटनेतील काठमांडू येथील उपचार घेत असलेल्या तळवेल येथील आशा पांडुरंग पाटील यांना रविवारी दि. १ सप्टेंबर रोजी रात्री मुंबईत विमानाने आणण्यात आले आहे. काठमांडू येथे आता ४ जण उपचार घेत आहे.
नेपाळ देशात देव दर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांच्या बसला दरीत कोसळून अपघात झाला होता. यात २७ जण मृत्युमुखी पडले होते. तर १६ जण जखमी होते. १ तरुणी बेपत्ता आहे. या १६ पैकी ११ जण आता भारतात परतले आहेत. (केसीएन) त्यात बॉंबे हॉस्पिटल येथे वर्षा पंकज भंगाळे, कुमुदिनी झांबरे, निलिमा भिरुड हे भाविक तर ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल येथे अविनाश भागवत पाटील (वय ४८, रा. दर्यापूर, ता. भुसावळ) आणि शारदा सुनील पाटील (वय ५०, रा. आचेगाव ता. भुसावळ) यांच्यासह तळवेल येथील सीमा अनंत इंगळे व अनंत ओंकार इंगळे हे उपचार घेत आहेत.
रविवारी आशा पांडुरंग पाटील यांना मुंबईत काठमांडू येथून आणण्यात आले असून त्यांच्यावर भाटिया रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर अपघातातील उर्वरित जखमी प्रवीण पांडुरंग पाटील यांच्यावर काठमांडू येथे जनरल कक्षात तर रेखा प्रकाश कोळी, ज्ञानेश्वर बोंडे, आशा बोन्डे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वर्षा भंगाळे, नीलिमा भिरूड, कुमुदिनी झांबरे यांचे यांचे ऑपरेशन करण्यात आले आहे .