अमळनेर तालुक्यातील धारच्या तलावातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील धार येथील पाझर तलावात बारावी इयत्तेतील एका विद्यार्थ्यांचा शुक्रवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयेश दीपक पाटील (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे.जयेश हा कंडारी गावाचा रहिवासी होता. त्याने शिक्षणासाठी शहरातील अयोध्या नगरात खोली घेऊन राहत होता. प्रताप महाविद्यालयात अकरावी झाल्यानंतर त्याने बारावीसाठी मारवड येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. (केसीएन)जयेश हा दीपक भरत पाटील यांचा एकुलता एक मुलगा आहे. जयेशच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आणि आजी, आजोबा आहेत.
जयेश आणि आणखी दोघे जण शुक्रवारी २९ रोजी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे समजते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो पाण्यात बुडाला. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत ठाण्याचे पोहेकाँ सुनील तेली, पोहेकाँ मुकेश साळुंखे यांच्यासह नागरिकांनी यांनी सदर तरुणाचा मृतदेह तलावातून काढला. रुग्णालयात नेला असता तेथे डॉक्टरांनी जयेशला मयत घोषित केले.