मनपाचे दुर्लक्ष ठरतेय जीवघेणे, जळगावात बायोमायनिंग प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात कचरा फॅक्टरी परिसरात नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत रहिवाश्यांच्या महानगरपालिकेला वारंवार निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या. मात्र मनपा प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष करून नागरिकांना जीवघेण्या त्रासात सोडून दिले आहे. जळगावात बायोमायनिंग प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.


याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जळगाव महानगर अध्यक्ष निलेश बाविस्कर यांनी माहीती दिली आहे. मी गेल्या काही वर्षापासून कचरा फॅक्टरी रोड परिसर येथे राहत असून येथील जळगाव शहराचे डम्पिंग ग्राउंड आहे. या डंपिंग ग्राउंड मध्ये बराच वर्षापासून कचरा संकलन केला जातो आहे. या जमा होणाऱ्या कचऱ्यापासून उन्हाळ्यात धूर तयार होतो. तसेच पावसाळ्यात दुर्गंधी सुटते परिसरात दुर्गंधी सुटते आणि या त्रासापासून परिसर खूप त्रस्त आहे. या परिसरात नेहमी आजाराची लक्षणे आढळतात.

तरी वेळोवेळी आरोग्य अधिकारी उदय पाटील व संबंधित अधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती व अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ पाठविली आहेत. मनपा अधिकारी येथील लोकांच्या आरोग्याशी खेळत असून दुर्लक्ष करतात. जे आरोग्य अधिकारी आहेत ते आरोग्य अधिकारी कमी आणि राजकीय पुढारी जास्त आहे. त्यांना आम्ही कॉल करतो तर ते आम्हाला ब्लॉक करीत असतात. आमचे फोन कट करत असतात. गेल्या वर्षी शहरातील महापौर, उपमहापौर यांनी त्यांच्या कार्यकाळात परिसरातील लोकांसाठी या कचरा फॅक्टरीवर बायोमायनिंग हा छानसा एक प्रोजेक्ट राबवला होता.
तो प्रोजेक्ट चालू असताना खूप दिलासा मिळाला होता. त्या प्रोजेक्टमुळे कचराही कमी झालेला होता. धूरही कमी झालेला होता. बायोमायनिंग हा प्रोजेक्ट पुन्हा सुरू करावा. मनपा प्रशासनाने हा प्रोजेक्ट येथून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करावी अन्यथा या विषयासंदर्भात नागरिक मनपाच्या बाहेर उपोषणास बसू. एक सुरक्षा कर्मचारी गेल्या काही महिन्यापूर्वी तेथील होणाऱ्या धुरीच्या त्रासामुळे जीव गमावून बसले पण एकही अधिकाऱ्याने या गोष्टीची दखल घेतली नाही. त्यामुळे तत्काळ आयुक्तांसह लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशीही मागणी निलेश बाविस्कर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.







