पारोळा तालुक्यात दिलासा
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील तामसवाडी येथील मध्यम प्रकल्प बोरी धरण हे शुक्रवारी रात्री शंभर टक्के भरले होते. रविवारी २५ ऑगस्ट रोजी ४:३० वाजेपर्यंत पाण्याची पातळी २७६ मीटर इथपर्यंत वाढली आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. त्यातून २७०६ क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
त्यामुळे बोरी नदीला पुराचे स्वरूप आलेले आहेत नदीकाठ वरील राहणाऱ्या नागरिकांनी अतिदक्षता घेणे गरजेचे आहे. बिनाकामाने, विनाकारण नदीपात्रात जाऊ नये किंवा आपले पशुधन त्या भागात पाठवू नये. जेणेकरून जीवाला धोका निर्माण होईल, म्हणून नागरिकांनी आपली, आपल्या मालमत्तेची, तसेच आपल्या पशुधनाची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.