रावेर तालुक्यातील रसलपूर येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : बोकडाने तेल सांडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रोजी सायंकाळी रावेर तालुक्यातील रसलपूर येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून ३२ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
बोकडाने घरातील पाच किलो तेल सांडल्याच्या कारणावरून भिका तडवी यांचे घरासमोर बोकड बांधुन ठेवल्याच्या कारणावरून दोन गटात वादावादी होऊन दंगल झाली. चापटा, बुक्के, लाथा, दगड, लोखंडी पाईप, चेनव्हिल याचा या दंगलीत वापर झाला यात सलीम तडवी व गंभीर तडवी दोघे जखमी झाले. या बाबबत सलीम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नाजीम रहेमान खाँ, फिरोज रहेमान खॉ, रिजवान खॉ यांचे सह २१ जणांविरुद्ध तर शेख निजामुद्दीन शेख कुतुबुद्दीन यांचे फिर्यादी वरून भिका तडवी, रमजु तडवी, सलीम तडवी, हसन तडवी यांचे सह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गैर कायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांचे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ. सतिष सानप करीत आहेत .