आपली दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही बदलवा, सगळे व्यवस्थित होईल. ‘नजर’ और ‘नजरिया’ बदलो! अहो, डोळ्यांची शस्त्रक्रिया करून दिसणे किंवा दृष्टी सुधारता येते परंतु; दृष्टिकोन बदलण्याचा कोणताच उपाय आज तरी आपल्याकडे नाही. हा दृष्टीकोन सुधारण्यासाठी आपल्या स्वतःला प्रयत्न करावे लागतील. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आपले जीवन आहे त्यापेक्षा सुंदर ते घडवू या… त्यासाठी दृष्टी आणि दृष्टीकोन बदलवणे क्रमप्राप्त आहे असे मौल्यवान विचार परमपूज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून व्यक्त केले.
सुधारणा घडवायचीच असेल तर बाहेर नव्हे, अंतर मनात आत बघा…परंतु आत बघण्यासाठी डोळे मिटून दोन मिनिटे स्वस्थ बसा. वास्तवात आज आपण दोन मिनिटे ही स्वस्त बसू शकत नाहीत, हे सत्य आहे. या भौतिक जगात आपण स्वतःला खूप गुंतवून घेतलेले आहे. आपल्या जीवनातले ९०% प्रश्न किंवा समस्या ह्या आपल्या दृष्टिकोनामुळेच उद्भवत असतात; त्यामुळे दृष्टिकोन जर चांगला असेल तर उत्तम होय…त्यासाठी नजर आणि नजरिया दोन्हीमध्ये चांगला बदल घडविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन परमपूज्य महाराज साहेबांनी केले.
आजच्या प्रवचनात राजा श्रेणिक आणि चेलना यांच्या कथाशृंखलेचा पुढील भाग परमपूज्य ऋजूप्रज्ञजी महाराज साहेबांनी सांगितला. चेलनाच्या मनातील श्रद्धा नष्ट व्हावी, जैन साधू बद्दल तिच्या मनात तिरस्कार निर्माण व्हावा म्हणून श्रेणिक षडयंत्र रचतो. मंदिरात जैन साधू रात्रीच्या मुक्कामाला थांबतात व तिथे एका वेश्येला पाठविले जाते. जैन साधूचे शुद्ध साधुत्व असते त्यांना लब्धी प्राप्त असते साधूचे रूप बदलते, चमत्कार घडतो. चेलनाने झुकावे यासाठी सारा आटापिटा केलेला असतो परंतु श्रेणिक यांनाच झुकावे लागते. शेवटी सत्य ते सत्यच असते याबाबतचे कथानक त्यांनी सांगितले.