इमारतीवरून उडी घेत पत्नीनेही संपविले जीवन; वाराणसी , गोरखपूरमध्ये घडल्या घटना
वाराणसी /गोरखपूर (वृत्तसंस्था ) ;- एमबीए करूनदेखील नोकरी न मिळाल्याने आणि बेरोजगारीमुळे नैराश्य आलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी आहे. त्याने वाराणसी येथे एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्याच्या पत्नीने गोरखपूर येथे घरवरून उडी मारून आत्महत्या केली. या तरुणाचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.हरिष बागेश (वय २७), संचिता श्रीवास्तव असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथील रहिवासी हरीश बागेश (28) आणि गोरखपूर येथील संचिता श्रीवास्तव एकाच शाळेत शिकायला होते. . हरीश आणि संचिता यांचे अकरावीपासूनच एकमेकांवर प्रेम करत होते. पुढे दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये संमती नसल्याने लग्नानंतर हे जोडपे मुंबईत राहून आणि नोकरी करत होते. मात्र संचिताची प्रकृती खालावल्यानंतर तिचे वडील तिला घेऊन गोरखपूरला गेले, तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. हरीशही मुंबईतील बँकेची नोकरी सोडून गोरखपूरला आला.
दोन दिवसांपूर्वी हरीश पाटण्याला जात असल्याचे सांगून गोरखपूरहून निघून गेला होता, मात्र तो वाराणसीला आला होता. येथे तो सारनाथ भागातील अटल नगर कॉलनीत होम स्टेमध्ये राहत होता.7 जुलै रोजी सकाळी हरीशचे काही नातेवाईक त्याचा शोध घेत होम स्टेवर पोहोचले. हरीश फोन उचलत नसल्याचे त्याने सांगितले. यानंतर सर्वजण हरीशच्या खोलीत पोहोचले. खोली आतून बंद होती. खिडकीतून डोकावले असता हरीश पंख्याच्या साहाय्याने फासावर लटकलेला दिसला.
हरीश लटकलेला पाहून नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. हरीशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. गोरखपूर येथे वडील रामशरण श्रीवास्तव यांच्या घरी राहणाऱ्या संचिताला हा प्रकार कळताच तिने छतावरून उडी मारून आत्महत्या केली.









