यावल तालुक्यातील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंजाळे या गावात मोर नदी पात्रात शेळगाव बॅरेजचे मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटरचे पाणी आहे. येथे गुरेचराईसाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात तोल जावुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल दिलीप बादशाह (वय ३०, रा.अंजाळे ता. यावल) हा दि. १८ मार्च रोजी गावातील परिसरात असलेल्या नदीपात्र परिसरात गुरे चराईसाठी गेला असता म्हशीला नदीपात्रातुन बाहेर काढत होता. तेव्हा त्याचाच पाय घसरल्याने तोल गेला आणी तरुण खोल पाण्यात बुडाला. ही सदरची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तेव्हा नागरिकांनी मोर नदीकडे धाव घेत तरूणास पाण्यातुन बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील दिलीप बादशाह शेतकरी कुंटुबातील आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे. मयत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, सात महिन्याची मुलगी आहे .