जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर गेल्या दोन दिवसात बेमोसमी पावसाची हजेरी लागली. यात नऊ तालुक्यात २३ हजार ६८२ शेतकऱ्यांचे सुमारे २१ हेक्टरवरील ज्वारी, बाजरी, मका, हरबरा, कांदा, भाजीपाला आदी शेत पिकांचे नुकसान झाले असत्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विभाग प्रशासनाने वर्तविला आहे.
जिल्ह्यात २६ आणि २७ रोजी वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव, चोपडा, यावल, पाचोरा आणि एरंडोल अशा ९ तालुक्यातील २५४ गावांमधील २३ हजार ६८२ शेतकऱ्यांच्या सुमारे २० हजार ८७२.५१ हेक्टर वरील रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, कांदा आदी शेतपिकाना याचा फटका बसला आहे.
चाळीसगाव २४६ गावे, ७२१२ शेतकऱ्यांचे ३९९४ हेक्टर, भडगाव १३ गावे १७३ शेतकरी ९२.३१ हे., अम ळनेर ६५ गावे २५३८ शेतकरी, ३६९० हे., पारोळा ४८ गावे ७२ शेतकरी ६३७५ हे., धरणगाव १६ गावे ३५४ शेतकरी १३५ हे., चोपडा ४१ गावे ५१५० शेतकरी ४९९०.२० हे., यावल, पाचोरा व एरंडोल यातील प्रत्येकी एक गाव यात ५५ शेतकऱ्यांचे ५० हेक्टर असे एकूण २५४ गावांमधील २३ हजार ६८२ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्राथमिक नुकसानीची नोंद करण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विभाग प्रशासनाने म्हटले आहे.