नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले तीसरे लॉकडाऊन येत्या 17 मे रोजी संपत आहे. देशात तीन वेळा लॉकडाऊन करुनही रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील नागरिकांना संबोधित केले. लॉकडाऊनबाबत मोदी काय नवीन घोषणा करणार याकडं सर्व देशवासियांचे लक्ष लागून होते. यादरम्यान मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही ठराविक मुद्द्यांवर आपण एक नजर टाकूया.

कोरोना व्हायरसने जगभरात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक नागरिकांना संसर्गीत केले आहे. जवळपास पावणेतीन लाख लोकांनाचा या आजारानं बळी घेतला आहे. भारतातही कोरोनाचा कहर आहे अनेकांनी या आजारामुळं आपला जीव गमवला आहे. त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो असं मोदींनी म्हंटल आहे. तसेच संपुर्ण जग कोरोनाविरुद्धच्या लढाईत गुंतलं आहे. पण तरीही कुणीही हार मानली नाही हरणं, थकणं, मानवाला मंजूर नाही. आपण लढू आणि जिंकूही.
कोरोनाविरुद्धच्या लढ्य़ात मोदींनी एक आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. जनतेला संबोधित करतांना त्यांनी असं म्हंटल आहे. की देशातील उद्योगधंदे रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक स्टेक होर्डरने सतर्क राहायला हवे. नव्या संकल्पासह मी आज एक विषेश आर्थिक पॅकेजची घोषणा करीत आहे. हे आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानाचे मुख्य काम करणार आहे. या आर्थिक पॅकेजची किंमत 20 लाख कोटी रुपये इतकी असून ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
स्वावलंबी भारत बनवण्यासाची सध्या गरज आहे. कोरोना संकट जेव्हा देशावर आलं होतं. तेव्हा देशाकडं एकही पीपीकिट उपलब्ध नव्हती तसेच एन95 मास्कचे उत्पादन खूप कमी होतं. आता दररोज भारतात किमान 2 लाख पीपीई किट आणि मास्कचं उत्पादन करण्यात येत आहे. संकटाचे रुपांतर संधीत करण्याची भारताची ही दृष्टी सर्वांसाठी प्रभावी ठरणार आहे.
कुणाला होईल या आर्थिक पॅकेजचा फायदा?
आज जाहीर झालेल्या आर्थिक पॅकेजमुळे सर्व क्षेत्रात गुणवत्ता वाढवेल. शेती व उद्योगांना या पॅकेजचा फायदा होईल. तसेच उद्योगधंद्यांना चालना मिळणार असल्याचं मोदींनी म्हंटल आहे. त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर असल्यानं भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अनेक उद्योगधंदे बुडाले आहे. त्यांना परत चालना देण्यासाठी या पॅकेजची मोठी मदत होणार आहे.
20 लाख कोटींचं हे पॅकेज 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला तसेच स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल देणार असल्याचं मोदींनी म्हंटल आहे. या पॅकेजमध्ये लॅंड, लेबर, लिक्वडिटीवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. तसेच कृषी, लघुउद्योग यांच्यासाठी आणि देशातील श्रमिकांसाठी, जो नियमित टॅक्स भरतो अशांसाठी या पॅकेजची मोठी मदत होणार आहे.
त्याचबरोबर लॉकडाऊनविषयी मोदींनी एक नवीन माहीती दिली आहे. लॉकडाऊन 4 नवीन नियमांचां असेल, राज्यांकडून मिळणाऱ्या माहितीनुसारच नवीन नियम ठरवले जाणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. लॉकडाऊन 4 ची माहिती 18 मेपूर्वी देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले







