प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
चंदकांत काळी
रावेर (प्रतिनिधी) :- रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यांमधे खरीपाची, हायब्रीट ज्वारीची व रब्बीत गव्हाचा पेरा कमी झाल्याने या भागात गुराच्या चार्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. गुरांना वाचविण्यासाठी शेजारील मध्य प्रदेशातून मिळेल त्या भावात चारा निर्यात केला जात आहे. प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
केळीचा आगार समजल्या जाणाऱ्या या रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यामधे हायब्रीड ज्वारीचा पेरा बंदच केल्याने रब्बीचा गव्हाचा पेरा अगदी पाच ते दहा टक्क्यांनी ठेवल्याने तिव्र चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी शेती आणि पशुधन या नाण्याच्या दोन बाजु समजल्या जातात . तरीपण या दोन प्रमुख पिकांकडे पाठ फिरवल्याने ही वेळ पशुपालकांवर आली आहे . या तिनही तालुक्यांमध्ये निव्वळ गुरांसाठी कुठलाही संकरीत बियाण्यांच्या चार्याची पेरणी केली जात नाही.
परंतु पशुंची वाढती संख्या लक्षात घेता सदरच्या चार्यात भागविणे पालकांना मोठ्या जिकरीचे जात आहे .म्हणून शेजारील मध्यप्रदेशातील राज्यांतुन मिळेल त्या भावात खरेदी करून निर्यात केली जात आहे . सदर तालुक्यांचा पट्टा केळी बागायत क्षेत्र असल्यामुळे कुणीही चार्याच्या पिकाकडे वळत नाही. परिणामी चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरभरा आणि तुर पिकाचाही पेरा या भागात ७० ते ७५ टक्के घटलेला आहे. म्हणुन चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे निर्यातीची वेळ आलेली आहे. काही पशु पालकांनी दुभत्या जनावरांनाच ठेवणे पसंत केले आहे. रिकाम्या गुरांना बाजाराचा रस्ता दाखवायला सुरुवात केली आहे.