चोपडा तालुक्यामध्ये तापी महामंडळ अंतर्गत गुळ मध्यम प्रकल्पासाठी ४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करण्यात आलेली होती. या शेतकऱ्यांचे शासनाकडे २३ कोटी रुपये घेणे होते. त्यापैकी ३ कोटी ५० लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहे.
२० कोटी ९४ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. मात्र निधी आला नाही. निधी मागणी केलेली आहे असे विविध कारणे सांगून आज पर्यंत गेल्या १६ वर्षापासून तापी महामंडळकडून शेतकऱ्यांना त्यांचा शेत जमिनीचा मोबदला मिळालेला नाहीये. यासाठी शेतकरी संघटना व शेतकरी यांनी सात नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते की, २१ नोव्हेंबर पर्यंत मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयात झोपा काढा आंदोलन सुरू केले.
गुळ मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयातून शेतकरी संघटनाच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर गोधड्या टाकून झोपा काढा आंदोलन सुरू केले. यात शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, शेतकरी हेमंत सुरणा, सुवर्णसिंग राजपूत, अशोक माळी, प्रवीण पाटील, भागवत पाटील, धनगर बाळू पाटील व अन्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
चोपडा तालुक्यामध्ये तापी महामंडळ अंतर्गत गुळ मध्यम प्रकल्पासाठी ४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करण्यात आलेली होती. या शेतकऱ्यांचे शासनाकडे २३ कोटी रुपये घेणे होते. त्यापैकी ३ कोटी ५० लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहे.
२० कोटी ९४ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. मात्र निधी आला नाही. निधी मागणी केलेली आहे असे विविध कारणे सांगून आज पर्यंत गेल्या १६ वर्षापासून तापी महामंडळकडून शेतकऱ्यांना त्यांचा शेत जमिनीचा मोबदला मिळालेला नाहीये. यासाठी शेतकरी संघटना व शेतकरी यांनी सात नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते की, २१ नोव्हेंबर पर्यंत मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयात झोपा काढा आंदोलन सुरू केले.
गुळ मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयातून शेतकरी संघटनाच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर गोधड्या टाकून झोपा काढा आंदोलन सुरू केले. यात शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, शेतकरी हेमंत सुरणा, सुवर्णसिंग राजपूत, अशोक माळी, प्रवीण पाटील, भागवत पाटील, धनगर बाळू पाटील व अन्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.