यावल ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातून बेपत्ता झालेल्या सुरेखा जितेंद्र उईके (वय ४४) वर्षे या महिलेचा मृतदेह यावल – जळगाव तालुक्याच्या सीमेवरील असलेल्या तापी नदीच्या किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेखा जितेंद्र उईके या महिला २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी काही एक न सांगता भुसावळातून निघून गेल्या होत्या. सदर महिलेची स्कुटी ही भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावर आढळून आली होती. याबाबत भुसावळ शहरच्या पोलीस ठाण्यात सदर महिला या हरविल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. महिलेचा मृतदेह शेळगाव बॅरेज च्या किनाऱ्यावर आढळून आला. यावरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.