शिंदे सरकारची अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
मुंबई (प्रतिनिधी) – बदली झाल्यानंतरही कामावरती रुजू न झालेल्या महसूल विभागातील ११ अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. कामावरती रुजू होण्यासाठी या अधिकाऱ्यांना एप्रिल पासून अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न आल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे शिंदे सरकरने अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.
एप्रिलमध्ये महसूल विभागातल्या बदल्या झाल्यानंतर जवळपास ३५ अधिकारी कामावर रुजू झालेले नव्हते. यावेळी अनेकदा महसूल विभागाकडून त्यांना रुजू होण्यासाठी नोटीस काढल्या होत्या. त्यातील अनेक अधिकारी कामावर रूजू झाले. मात्र अधिकारी अद्याप ही रुजू झाले नाही. अखेर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यात मुंबई, पुणे, अमरावती , औरंगाबाद नागपूर आणि नाशिक असे सहा महसूल विभाग आहेत. या महसुली विभागापैकी नागपूर आणि अमरावतीसाठी अधिकारी रुजू हेण्यास शक्यतो तयार होत नाहीत.
त्यामुळे नागपूर विभागात रुजू न होणाऱ्या सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आल आहे. यात विनायक थविल- (वडसादेसांगज- गडचिरोली), सरेंद्र दांडेकर (धानोरा गडचिरोली), बी.जे. गोरे (ऐटापल्ली गडचिरोली), पल्लवी तभाने (संजय गांधी योजना वर्धा), सुनंदा भोसले -(खरेदी अधिकारी नागपूर), बालाजी सूर्यवंशी -(अप्पर तहसीलदार नागपूर), सुचित्रा पाटील -(करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.