जळगाव (प्रतिनिधी) – भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब बच्छाव यांचे नेतृत्त्वात जळगाव ग्रामीण विधानसभा धरणगाव तालुक्यातील एकलव्य संघटनाचे आणि टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती जळगाव जिल्हाअध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला.
शेतकर्यांच्या हितासाठी आणि गोर गरीब जनतेच्या कल्याणासाठी आता सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा असेल तर बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यात आता तेलंगणा मॉडेलची गरज असून, शेतकरी बांधव आणि युवकांनी आता भारत राष्ट्र समिती सोबत यावे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी दिली.