स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आली स्पर्धा
जामनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा जामनेर, यांचेतर्फे स्वातंत्र्य दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उस्फूर्तपणे भाग घेतला होता.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रात सुमारे ४५० शाखा आहेत. जळगाव जिल्ह्यात एकुण २२ शाखा असून जामनेर शाखा ही जिल्ह्यातील लीड शाखा आहे. या शाखेने स्वातंत्र्य दिनानिमीत्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजीत केली होती. या निबंध स्पर्धेला जामनेर तालुक्यातील विविध शाळातील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती. ५वी ते ८वी साठीच्या गटासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विषय देण्यात आले होते.
या गटात न्यू इंग्लिश स्कूल जामनेरची विद्यार्थिनी अक्षरा विजय सैतवाल (८ वी) हिने प्रथम क्रमांक, आ.ग.र. गरुड माध्यमिक विद्यालय, शेंदुर्णी येथील विद्यार्थी प्रतिक समाधान चौधरी (इ.८वी) याने व्दितीय तर इंदिराबाई ललवाणी माध्य. विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थी मनोज रविंद्र पाटील (इ.७ वी) याने तृतीय क्रमांक पटकावला.
इयत्ता ९वी ते १०वी गटासाठी अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज, पुस्तके वाचण्याचे महत्व, माझा आवडता छंद आणि तो मला आनंद कसा देतो हे तीन विषय देण्यात आले होते. या गटात ललवाणी माध्य. विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थीनी कु. आर्या धनराज वराडे इ. ९वी हीने प्रथम क्रमांक, रत्नाबाई जैन माध्य. विद्यालय तोंडापूर येथील विद्यार्थी रुद्र गजानन जाधव इ. ९वी याने व्दितीय तर न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी या शाळेतील विद्यार्थीनी पुनम संदिप खुरपडे हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
इयत्ता ११ वी ते १२वी या गटासाठी हवामान बदल, कारणे आणि उपाय, राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमीका, जातिव्यवस्था निर्मूलनासाठी आव्हाने आणि उपाय हे तीन विषय देण्यात आले होते. या गटात आर. टी. लेले विद्यालय, पहूर येथील विद्यार्थीनी क्रांती संतोष इंगळे इ.१२वी हीने प्रथम, ललवाणी जामनेर येथील विद्यार्थीनी देवयानी इश्वर राऊळकर इ. ११वी तर राजमल ललवाणी विद्यालय, शेंदुर्णी येथील विद्यार्थीनी सानीया दगडू तडवी इ. ११वी हिने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे, शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे, प्रधान सचिव बी. आर. पाटील, कार्यकर्ते संतोष सराफ, रमेश गायकवाड, रितेष मोरे, तिर्थराज सुरवाडे यांनी परिश्रम घेतले. सदरहू निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षिस वितरण समारंभ यथावकाश आयोजीत करण्यात येईल.