जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी शिक्षण संकुल परिसर व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील कृषि अन्न व तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, परीक्षा विभागाचे विभाग प्रमुख व कृषी संकुल परिसराचे परिसर संचालक डॉ.एस.एम. पाटील, डॉ.अशोक चौधरी (शिक्षण व संशोधन संचालक), प्रा. आर. डी. चौधरी, (क्रीडा अधिकारी), अतुल बोंडे ( सा. कुलसचिव ) रा.सो.यो.चे तिन्ही महाविद्यालयाचे कार्यक्रम अधीकारी यांच्यासह सर्व प्राध्यापक/प्राध्यापिका, कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी डॉ.एस.एम.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. यानंतर प्राचार्य डॉ. अशोक चौधरी यांनी स्वतंत्र दिनाचे महत्त्व सांगितल.
प्रास्ताविक क्रीडा अधिकारी प्रा.आर.डी.चौधरी यांनी केले. प्राचार्य डॉ.शैलेश तायडे यांनी माझी माती माझा देश या योजनेचे महत्त्व सांगून वीर जवानांना अभिवादन केले. प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे यांनी स्वतंत्र दिनानिमित्त मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंच प्राण प्रतिज्ञेचे प्रा.बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. गोणशेटवाड बी. एम. यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.ललित जावळे, कुंदन धनगर, सचिन पाटील, प्रा.एन.डी.पाटील, दुर्गा सरोदे व सारिका पाटील यांनी सहकार्य केले.