भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील खडका गावातील रहिवासी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष तथा सरपंच पुत्र गिरीश देविदास तायडे यांच्यावर पूर्ववैमानस्यातून चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री पवणे दहा वाजेच्या सुमारास घडली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधार कार्ड लोन 50000 ते 10 लाखपर्यंत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇 👇 👇
👉👉येथे क्लिक करा👈👈
गिरीश तायडे यांना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास वैभव डोळे नामक व्यक्तीने फोन करून रेती टाकण्याचे ठिकाण पाहण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार गिरीश तायडे व त्यांचा चालक आकाश सपकाळे हे खडके एमआयडीसीमध्ये सोना डेअरीच्या डाव्या बाजूस बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी गेले. तेथे जुन्या वादातून जितेंद्र खंडारे आणि त्याच्यासोबत असणारे इसमाने वाद घातला. त्यावेळी जितेंद्र खंडारे याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने गिरीश तायडे यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने डाव्या मानेवर, डाव्या हाताच्या कोपऱ्यावर, बगलेत, पोटावर, कमरेवर वार करून गंभीर जखमी करीत पळ काढला.
अत्यवस्थ अवस्थेत तायडे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा अंदाज आहे. गिरीश तायडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तायडे यांची पोलीस अधिकार्यांनी भेट घेत संशयितांची नावे जाणून घेतली. दरम्यान, गिरीश तायडे हे खडका सरपंच यशोधरा देविदास तायडे यांचे पूत्र आहे.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गिरीश तायडे यांचे चालक आकाश सुरेश सपकाळे (वय ३२, रा. खडके मिल गेट समोर) यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र खंडारे आणि अनोळखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे हे करीत आहेत.