जळगाव (प्रतिनिधी) – वीजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे २ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील वावडदा येथे शनिवारी १३ मे रोजी दुपारी घडली आहे. लागलेल्या आगीत अंदाजे ४ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वावडदा येथील शेतकरी जानकीराम फकीरा पाटील हे आपल्या परिवारासह शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे तालुक्यातील वावडदा शिवारात शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. हा ऊस रसवंतीकरता वापरला जातो. शनिवारी १३ मे रोजी जानकीराम फकीरा पाटील हे शेतात असताना अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली. या आगीत २ एकर ऊस जळून खाक झाला असून जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी जानकीराम पाटील यांनी केली आहे.