जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील राजमालती नगरात राहणारी विवाहिता कुणाला काहीही न सांगता दोन मुलांना सोबत घेवून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी बुधवारी २६ एप्रिल रोजी शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत शहर पोलीसांनी दिलेली माहिती वरून, मिथून डिगंबर जाधव ( वय – ३२ ) रा. दुध फेडरेशन, राजमालती नगर, जळगाव हे आपल्या पत्नी शारदा, मुलगा अनमोल (वय- ८) आणि रूपेश (वय- ५) यांच्यासोबत राहायला आहे. हमालीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता मिथून हे नेहमीप्रमाणे कामाला निघून गेला. त्यावेळी त्यांची पत्नी शारदा ही अनमोल आणि रूपेश यांना सोबत घेवून कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. जातांना शेजारी राहणाऱ्या उषाबाई याच्याकडे घराची चावी दिली होती. दरम्यान, दुपारी ३ वाजता मिथून हे घरी जेवणासाठी आला त्यावेळी घराला कुलूप लावलेले दिसले. तसेच उषाबाई यांच्याकडून चावी घेतली तर घरात स्वयंपाक देखील केलेला नव्हता. मिथून यांनी पत्नी शारदा आणि दोन्ही मुलांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली सोनवणे करीत आहे.