जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक विभागातर्फे नुकतेच वैद्यकिय अभ्यासक्रमाचे निकाल जाहिर करण्यात आले असून प्रत्येक वर्षाचा ९५ टक्क्याहून अधिक निकाल लागला आहे .
प्रथम वर्ष बोधलाजी अदिबा मोहम्मद शरीफ ७०८ गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम आला तर राहूल ललीत जैन यास ६०८ गुण मिळवत द्वितीय, प्राजंल पंडीतराव फुसे ६७४ गुण मिळवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रथम वर्षाची २०६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती यात १७९ विद्यार्थी पास झाले असून ८६टक्के निकाल लागला आहे. द्वितीय वर्षात प्रथम माधुरी भास्कर मस्के ७११ गुण, द्वितीय चिंतन विजय चौधरी ६८० गुण तर तृतीय अमित सुनिल साखरे ६७८ गुण एकुण १५१ विद्यार्थ्यानी परिक्षा दिली यातील १४४ पास झाले असून ९५.३६ टक्के निकाल लागला आहे. तृतीय वर्ष गौरव संतोष वाबले ७०५ गुण, व्दीतीय सायली निवृत्ती गाडगे ६८५ गुण तर तृतीय अरिबा शरीब अझमी ६७८ गुण एकुण १३७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते यातील १३१ विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी ९५.६२ इतकी आहे. तर अंतिम वर्ष प्रियंका अमित पंडया ६४३ गुण, समृज्ञी सुरेश पठारे ६३६ गुण आणि कायनात मोहम्मद कासीम शेख ६३५ अंतिम वर्षात १०५ विद्यार्थी परिक्षेस बसले होते यातील १०० विद्यार्थी पास झाले असून निकाल ९५.२३ टक्के इतका लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील, डी.एम.कॉर्डिओलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील, अधिष्टाता डॉ.एन एस आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे.
अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर आणि प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व डॉक्टरांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे सतत ९५ टक्के निकाल लागला. उच्च निकालाची यशोेगाथा कायम राखण्यात महाविद्यालयास यश येत आहे. संस्थाध्यक्ष या नात्याने मला सर्व गुरूजनांचा अभिमान वाटतो तसेच उर्तीण विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो असे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.