जळगाव (प्रतिनिधी) – कामगार कल्याण मंडळ आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जळगाव म.न.पा.च्या आयुक्त विद्या गायकवाड अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया उद्घाटक म्हणून लाभले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख, सहाय्यक कामगार आयुक्त च.ना.बिरार, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास,रोजगार व मार्गदर्शन केंद्र, चे वि.वा.मुकने, उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख, कौशल्य विकास आणि रोजगार समन्वयक प्रा. भागवत पाटील आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. मेळावा घेण्यामागील भुमिका कामगार कल्याण मंडळ अधिकारी कुंदन खेडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केली. अध्यक्षीय भाषणात विद्या गायकवाड यांनी, भारत हा तरुणांचा देश आहे. म्हणून तरुणांच्या हातांना रोजगार मिळावा हा उद्देश असल्याचे सांगितले.
सुत्रसंचलन भानूदास जोशी यांनी तर आभारप्रदर्शन किशोर पाटील यांनी केले. मेळाव्यास ८७६ उमेदवारांची उपस्थिती लाभली. मेळाव्यात नोकर भरतीसाठी १७ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थीत राहीले. ९५ उमेदवारांना जागेवरच रोजगार प्राप्त झाला तर १३० उमेदवारांना व्यवस्थापनसोबत चर्चा करुन अंतिम मुलाखतीत रोजगार प्राप्त होणार आहे. या प्रसंगी कामगार कल्याण मंडळचे अधिकारी, कर्मचारी आणि नूतन मराठा महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.