जळगाव प्रतिनिधी) : -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तत्त्वशील (विवेकशील) विचार या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेला सोमवारी प्रारंभ झाला.
प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्र उभारणीत शास्त्रीय व तर्कशील दृष्टीकोन असणाऱ्या तरूणांची गरज असल्याचे प्रा. इंगळे म्हणाले. मिलींद देशमुख, नंदिनी जाधव, अण्णा कडलस्कर, निता सामंत हे यावेळी उपस्थित होते. चर्चा, संवाद आणि प्रयोग या माध्यमातून कार्यशाळा घेतली जात आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यातून पाच महाविद्यालयातून व विद्यापीठातून एकूण ४२ जणांचा या कार्यशाळेत सहभाग आहे.