मुंबई (वृत्तसंस्था ) – येत्या दिवाळीत भारतातील चार मेट्रो सिटींमध्ये ५ जी नेटवर्क सेवा सुरु करणार असल्याची घोषणा रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी आज वार्षिक सभेत केली. यासाठी २ लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
जीओ ५ जीची सेवा दिवाळीपासून सुरु होईल. ही पहिल्या टप्प्यातील सेवा असेल. सुरुवातीला केवळ चार शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल. दिवाळीच्या कालावधीमध्ये या सेवेचा शुभारंभ होईल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्यामध्ये ही सेवा पुरवली जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत फाइव्ह जीची सेवा अनेक छोटी शहरं, तालुके आणि गावांमध्येही पोहचेल असा विश्वास मुकेश अंबानींनी व्यक्त केला आहे.
संच गुगलसह स्वस्त ५ जी फोनदेखील लाँच केला जामार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज ग्राहकांची संख्या ४२.१ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. जिओचे ग्राहक दर महिन्याला सरासरी २० जीबी डेटाचा वापर करतात. हे संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. जिओ फायबर ११ लाख किलोमीटरचा परिसर कव्हर करत आहे. देशात प्रत्येक तीन पैकी दोन ग्राहक जिओ फायबरचा वापर करताय,” असंही अंबानी म्हणाले.