मुंबई ( प्रतिनिधी ) – आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीला फाटा देत एकनाथ शिंदे यांनी आज अखेर भाजपशी घरोबा करत नवं सरकार स्थापन झालं आहे.
राजभवन इथे हा शपथविधी सोहळा पार पडला देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास हा तितकाच रंजक आहे. एक रिक्षावाला ते राज्याचे 30 वे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा राहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री घोषणा ही बाबही अनेकांसाठी सरप्राईजिंग होती.
1980 मध्ये त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख पदावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली .1997 मध्ये ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आल्यावर त्यांनी अधिक सक्रिय राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेत अनेक पदे भूषवली आणि त्यानंतर 2004 मध्ये आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात आले.त्यानंतर एकनाथ शिंदे हे सलग विजयी होत गेले आणि दोनदा राज्यात मंत्रीही राहिले.यापूर्वी ते महाराष्ट्र सरकारमध्ये नगरविकास मंत्री होतं, तसेच अन्यही महत्वाची पद होती. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यातून सर्वात जास्त चर्तेत राहिलेलं नाव आहे.