जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील हॉटेल प्रेसिडेंट कोटेजमध्ये आयोजित स्नेहमेळाव्यात आज बांगर सिमेंटच्या वितरकांचा सत्कार बांगर सिमेंट कम्पनीचे व्हाईस प्रेसिडेंट संजयसिंग यांच्या हस्ते करण्यात आला . आमचा भुसावळचा निर्मिती प्रकल्प २ वर्षात उभारला जाऊन प्रत्यक्ष उत्पादन सुरु करण्याचा आमचा संकल्प असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले . या स्नेहमेळाव्यात जिल्ह्यातील ४० वितरक सहपरिवार सहभागी झाले होते . सर्व सहभागी वितरकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले .
बांगर सिमेंट कंपनी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे . फाईननेस , स्ट्रेथिंग , सेटिंग्ज मेंटेनेन्सफ्री अशा सर्व मापदंडांवर ग्राहकांच्या कसोटीला उतरलेले हे उत्पादन गेल्या ४२ वर्षात देशासह विदेशातही सर्वांच्या पसंतीचे ठरलेले आहे १९७९ सालात राजस्थानातील बेवर येथून सुरु झालेली या उद्योगाची वाटचाल आता जगाला कवेत घेते आहे . बांगर सिमेंट कंपनीने दुबईत जगातील सर्वात मोठा सिमेंट उत्पादन प्रकल्प उभारलेला आहे . उत्तर महाराष्ट्रातील ग्राहकांना तात्काळ आणि मुबलक सिमेंट उपलब्ध व्हावे म्हणून बांगर सिमेंट कंपनी भुसावळजवळ नवा उतपादन प्रकल्प उभारणार आहे त्यासाठी १५४ एकर जागा घेतली असून पुढच्या २ वर्षात येथे उत्पादन सुरु करण्याचे या कंपनीचे नियोजन आहे , अशी माहिती या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने बांगर सिमेंट कम्पनीचे व्हाईस प्रेसिडेंट संजयसिंग यांनी दिली .
स्टेट हेड नितीन पालीवाल म्हणाले की , वेगाने वाढणारी आणि सध्या देशात एकूण कामगिरीत तिसऱ्या क्रमांकावर असणारी आमची श्री सिमेंट कंपनी आहे . गतवर्षी या कंपनीने २३०० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे देशातील आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये ही कंपनी ४२ व्य क्रमांकावर आणि या यादीतील एकमेव सिमेंट कंपनी आहे . वितरकांचे हित जपणारी कंपनी अशी आमची ख्याती आहे .
जय अंबिका मार्बल्स ( भुसावळ ) , महावीर टाईल्स ( पाचोरा ) , नवकार ट्रेडर्स ( फत्तेपूर ) अम्बी स्टील ट्रेडर्स ( अमळनेर ) श्री जी ट्रेडर्स ( चोपडा ) या वितरकांनी केलेल्या कामाची यावेळी सर्वच उपस्थितांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली .
वितरकांच्या या स्नेहमेळाव्यात बांगर सिमेंट कंपनीचे महाराष्ट्र आणि गोव्याचे स्टेट हेड नितीन पालीवाल , झोनल हेड प्रशांत कुलकर्णी , साऊथ वेस्ट महाराष्ट्र टेक्निकल इन्चार्ज आशिष गणवीर यांनीही सहभागी वितरकांना मार्गदर्शन केले . विक्री वाढीसाठी ग्राहकसेवेतील सातत्याच्या मुद्द्यावर तपशीलवार चर्चा केली . उत्तर महाराष्ट्राचे विभागीय मार्केटिंग प्रमुख निलेश इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगुन इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या रितू व्यास यांनीं केले .