जळगाव ( प्रतिनिधी ) – पर्यावरण सखी मंचच्या राज्य उपाध्यक्षा, नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनीच्या अध्यक्षा मनिषा किशोर पाटील यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल त्यांना मौलाना आझाद फाऊंडेशन ( जळगाव)चा सामजिक क्षेत्रातील भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे .
मनिषा पाटील यांचे सामजिक कार्य स्तुत्य असून गरजू व वंचित तसेच दिव्यांग यांच्यासाठी त्या नेहमी विशेष उपक्रम राबवित असतात. या पूर्वी देखील त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांचे या पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.