जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद विकास सोसायटीची निवडणूक नुकतीच झाली शेतकरी पॅनल आणि नम्रता पॅनल यांच्यात सरळ लढत होऊन नम्रता पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले.
अनुसूचित जाती जमातीचे विजय शांताराम सावळे नम्रता पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, सर्वसाधारण कर्जदार सभासदांमधून नम्रता पॅनलचे सर्व ८ उमेदवार निवडून आले राजधर मालकर (६५०), राजेंद्र गीते (६४७), जयप्रकाश जैन (६३१), शालिग्राम मालकर (६२७), खाटीक हाजी (६०७), विजयसिंह नाईक (५८७), ज्योतीलाल चव्हाण (५९०), बालू बडगुजर (५७२) , इतरमागास वर्गात सुनील क्षीरसागर (६२१) , सुरेश भडांगे (६२५) अशी या विजयी उमेदवारांची नावे आणि कंसात त्यांना मिळालेली मते आहेत .
शेतकरी पॅनेलचे गंगाधर बडगुजर , रफिक शेख , संतोष कुटे , विठ्ठल परमाणे , रवींद्र बडगुजर , किशोर गरुड , सौ इंदूबाई पाटील , किशोर भोई हे पराभूत झाले आहेत . नम्रता पॅनलचे पॅनल प्रमुख सुखदेव गीते , शालिग्राम मालकर, राजु क्षीरसागर, विठ्ठल गीते, वसंत गीते, विठ्ठल गीते, रवी जाधव, रवी गीते, राजू माळी, प्रशांत माळी, मौजूलाल जैन, दिलीप जैन, मिलिंद देव, देवेंद्र देव, सुरेश बडगुजर, किरण बडगुजर, राजधर मेटे, बी डी पाटील , गोरख पाटील, शिवदास राठोड, शिवदास राठोड, डॉ नितीन चव्हाण, योगेश हटकर, धनराज मदने, गुलाम बागवान , खुर्शीद मिस्तरी, सुभाष सावळे यांनीं या विजयासाठी परिश्रम घेतले.