नंदुरबार ( प्रतिनिधी ) – तळोदा येथील दावल शाह बाबा मुला-मुलींच्या बालगृहातून तीन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून पळवून नेले आहे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तळोदा येथील बालगृहातून 11 व 13 व 17 वयोगटातील मुलींना कुणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय असून बालगृहाच्या अधीक्षिका मनिषा किसन गावीत यांनी तळोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. तपास प्रिया वसावे यांच्याकडे देण्यात आला आहे. 15 एप्रिलच्या रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी मुली बालगृहातून बाहेर पडल्या. त्या परत न आल्याने पोलिसांना कळवण्यात आले.